Andharyug (अंधारयुग) By Shashi Tharur / Sakal Publication
Andharyug (अंधारयुग) By Shashi Tharur / Sakal Publication
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
per
*'अंधारयुग'*
*ब्रिटिशांची भारतातील जुलमी राजवट*
*लेखक:- शशी थरूर*
*अनुवाद:- आ. श्री. केतकर*
*पुस्तकाची पाने:- ३८४*
*पुस्तकाची किंमत:- ४००₹*
कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध असलेले, विक्रमी खपाच्या पुस्तकांचे लेखक शशी ठरुर यांनी The Era of Darkness : The British Empire in India (अंधारयुग: ब्रिटिशांची भारतातील जुलमी राजवट) या खळबळजनक पुस्तकात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीने भारताला कसे उद्ध्वस्त केले ते सखोल आणि अचूक संशोधनातून दाखवून देतात.
नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून ती ब्रिटनला नेणे; भारतीय कापड, जहाजबांधणी, पोलाद अशा उद्योगांचा केलेला विध्वंस; शेती, सिंचन क्षेत्रात घडवून आणलेले नकारात्मक बदल, अशा वेगवेगळ्या मार्गांनी वसाहतवादी ब्रिटिशांनी भारताचे कसे शोषण केले, ते शशी शशी थरूर सिद्ध करतात. भारताला राष्ट्राचे रूप देणे, लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य रुजवणे, कायद्याचे राज्य, रेल्वे आणि टपाल व्यवस्था अशा अनेक चांगल्या गोष्टी ब्रिटिश साम्राज्यामुळे झाल्या, असा युक्तीवाद अनेकदा केला जातो. साम्राज्याच्या बाजूने दिलगिरीच्या सुरात असा युक्तिवाद करणाऱ्या पाश्चात्त्य आणि भारतीय विद्वानांचे दावे थरून खोडून काढतात. ब्रिटिशांच्या येण्याने इंग्लिश भाषा, चहा आणि क्रिकेट यांचा परिचय होणे एवढाच फायदा भारतीयांना झाला. अर्थातच या बाबींचा परिचय करून देण्यामागे वसाहतीतल्या नागरिकांच्या फायद्याचा विचार नसून वसाहतवाद्यांची सोय हा हेतू होता.
भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्वाच्या कालखंडाविषयी असलेले अनेक गैरसमज उत्तम निवेदनशैली आणि ठाम युक्तिवाद यांच्या आधारे हे पुस्तक खोडून काढते.